26 April 2023

भारत-चीन सीमेवर वसलेलं देशातील पहिलं गाव ठरलं ‘माना’

BRO ने भारत-चीन सीमेवर वसलेल्या उत्तराखंडमधील ‘माना’ या सीमावर्ती गावाला ‘भारताचे पहिले गाव’ म्हणून घोषित केले आहे. बीआरओने या गावाच्या प्रवेशद्वारावर ‘भारताचे पहिले गाव’ असा साईन बोर्ड लावला आहे.

त्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले असून आता माना हे देशातील शेवटचे नव्हे तर पहिले गाव म्हणून ओळखले जाईल, असे लिहिले आहे.

माना हे भारतातील पहिले गाव कसे बनले?
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माना हे गाव पूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जात होते. पण आता त्याला नवी ओळख मिळाली आहे. BRO ने याला देशातील पहिले गाव म्हणून मान्यता दिली आहे.

21 ऑक्टोबर 2022 रोजी पीएम मोदींनी त्यांच्या माना दौऱ्यात सांगितले होते की सीमेवर वसलेले प्रत्येक गाव हे देशातील पहिले गाव आहे.

माना गाव 3219 मीटर उंचीवर आहे.
भारत-चीन सीमेवर वसलेले हे गाव चीनच्या सीमेपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आहे. मानाची उंची समुद्रसपाटीपासून 3219 मीटर आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव सरस्वती नदीच्या काठावर वसले आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023